अकोट : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटच्या निसर्गसंपदेचा आणि आदिम संस्कृतीचा जवळून अनुभव देणारा नरनाळा महोत्सव यंदा दि. १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज याबाबत माहिती देत महोत्सवाच्या तयारीला वेग देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
या महोत्सवाच्या माध्यमातून मेळघाटचे वनवैभव, ऐतिहासिक वारसा आणि आदिवासी परंपरा नागरिकांसमोर उलगडणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जंगल सफारी, साहसी खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असल्याने पर्यटकांसाठी हा एक खास पर्व ठरणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक दिवशी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून प्रसिद्ध कलावंतांची उपस्थिती हे यंदाच्या महोत्सवाचे मोठे आकर्षण असणार आहे.
लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’, ऐतिहासिक सादरीकरणासाठी प्रसिद्ध ‘शिवशंभू गर्जना’, तसेच सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट यामुळे महोत्सवाची रंगत अधिक वाढणार आहे. या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Related News
Akola Crime News : अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मलकापूर परिसर दरोडेखोरांच्या टार्गेटवर; सतर्क नागरिकामुळे मोठी चोरी टळली
CCTV Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बिबट्या’च्या अफवेने खळबळ; व्हायरल व्हिडीओमागचं सत्य समोर
पुण्यातील मित्रांचा प्रवास दुःखात संपला; कोटा एक्सप्रेसवेवर 3 जणांचा मृत्यू
खापरखेड़ा थर्मल पॉवर प्रकल्पात आग , बॉम्ब धमकीमुळे सुरक्षा तातडीने वाढवली; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; मुलगी आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत प्रशासकीय अधिकारी पदाची नोकरी
यवतमाळात धक्कादायक घटना: माकडासाठी झाडलेलं इंजेक्शन नागरिकालाच लागलं, वन विभागावर प्रश्नचिन्ह
अकोल्यात राजकीय धक्का! मंगेश काळे आणि चार नगरसेवक शिंदे गटात सामील
एकनाथ शिंदेंनंतर उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; शिवसेना शिंदे गटात राजकीय चर्चेला उधाण
डोंबिवलीत खेळताना चिमुरड्यावर काळाचा घाला, इलेक्ट्रिक फिडरला स्पर्श झाल्याने 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
नवी मुंबईतील मोसारे गावात स्फोटक साठ्यामुळे भीतीचे वातावरण
Bee Attack : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांचा अचानक हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळापळ; चंद्रपूर, जळगाव, नंदुरबारमध्ये अनेक जखमी
Virar News: 21 वर्षीय जैन भिक्षू नम्ररत्न विजय यांचा दु:खद मृत्यू, जैन समाजात शोककळा
निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठीही विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. निसर्ग निर्वाचन संकुल, शहानूर येथे जंगल सफारी, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग यांसारख्या रोमांचक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर पोपटखेड धरण परिसरात नौकाविहार, बोटिंग आणि झॉर्बिंग वॉटर बॉल यांसारख्या जलक्रीडा पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. पक्षीनिरीक्षण, गड भटकंती आणि छायाचित्र प्रदर्शन या उपक्रमांमुळे निसर्ग आणि इतिहासाचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय आदिवासी नृत्यकलेचे सादरीकरण हे महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. मेळघाटातील पारंपरिक जीवनशैली, लोकसंस्कृती आणि कला यांचे दर्शन घडवून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे.
महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी आणि विविध माध्यमांद्वारे माहिती सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. पर्यटकांच्या सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वैभव आणि वनसमृद्धीने नटलेला नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्याचा अभिमान असून, या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या अनोख्या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
