प्रधानमंत्री मोदींनी केले नवीन कॅम्पसचे उद्घाटन
संपूर्ण जगात शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेले नालंदा विद्यापीठ
तब्बल 800 वर्षांनंतर पुन्हा जिवंत झाले आहे.
Related News
CIA Plot to Kill Prime Minister Modi : भारत-रशियाच्या गुप्तहेरांनी डावलला धक्कादायक कट
CIA plot to kill Prime Minister Mo...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
ट्रम्पचा भारताला इशारा: "रशियन तेल थांबवा, नाहीतर भरावे लागतील प्रचंड शुल्क"
भारताने दाव्याचे फेटाळले समर्थन; तरीही रशियन तेल आयात २० टक्क्यांनी वा...
Continue reading
दानापुर-माळेगाव रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; अपघातांचा धोका वाढला
दानापुर-माळेगाव रस्ता सध्या बंगाली काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकल...
Continue reading
आलेगावात ओबीसी आरक्षणाच्या असुरक्षिततेतून ओबीसी योद्धाची आत्महत्या; परिसरात शोककळा
आलेगाव तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने आज संपूर्ण ओबीसी समाजाला हाद...
Continue reading
सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय...
Continue reading
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची नाराजी
मानधन न मिळाल्याने संताप; OTP अडचणींमुळे हजेरीवरही संकट
अकोला :मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तेल्हा...
Continue reading
भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाड्यास प्रारंभ शहरात राबविले स्वच्छता अभियानखामगाव ::- भाजपाच्या वतीने आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्यास स्वच्छता...
Continue reading
मोदींचा ७५ वा वाढदिवस : अमित शाह ते देवेंद्र फडणवीस – मोदींबरोबरच्या आठवणीमधील भावनिक किस्से
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर २०२५) आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या महत...
Continue reading
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
17 देशांच्या सहकार्याने, भारत सरकारने राजगीरजवळ नालंदा विद्यापीठाचे नवीन कॅम्पस बांधले,
ज्याचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर,
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि 17 देशांचे राजदूत आणि इतर अनेक पाहुणे उपस्थित होते.
नालंदा विद्यापीठाचे नवे कॅम्पस अनेक अर्थाने खास आहे,
ज्यामध्ये परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या
नवीन कॅम्पसच्या बांधकामात सहकार्य करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले.
ते आपल्या भाषणात म्हणाले की,
नालंदा हे केवळ भारताचे पुनर्जागरण नाही,
अनेक देशांचा वारसा तिच्याशी जोडला गेला आहे.
नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बाधणीत भागीदार देशांनीही सहभाग घेतला आहे.
वास्तविक, 2007 मध्ये झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेदरम्यान,
प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनावर चर्चा झाली होती.
यानंतर भारताच्या तत्कालीन यूपीए सरकारने 2010 मध्ये
नालंदा विद्यापीठ कायदा संमत केला.
2014 मध्ये केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर
तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 19 सप्टेंबर 2014 रोजी
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसची पायाभरणी केली.
तब्बल 9 वर्षानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजरोजी या कॅम्पसचे उद्घाटन केले.
नालंदा विद्यापीठ राजगीर या ऐतिहासिक शहराच्या पाच टेकड्यांपैकी एक असलेल्या
वैभरगिरीच्या पायथ्याशी बांधले गेले आहे.
सुमारे 455 एकर परिसरात पसरलेल्या नवीन कॅम्पसमध्ये 1750 कोटी रुपये खर्चुन
नवीन इमारती आणि इतर सुविधा बांधण्यात आल्या.
सध्या या कॅम्पसचे काम सुरू आहे.
नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 24 इमारती आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नालंदा युनिव्हर्सिटीच्या नवीन कॅम्पसचा परिसर
अतिशय मनमोहक आहे.
या संकुलाचा एक चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे.
विविध इमारतींभोवती जलाशय निर्माण झाले आहेत.
जे बिहारच्या पारंपारिक अहर पेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमवर आधारित आहे.
म्हणजेच परंपरेसोबत आधुनिकतेचा संगम या कॅम्पसमध्ये पाहायला मिळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/the-offer-received-from-tdpl-india-aghadi-for-the-post-of-lok-sabha-speaker-has-spoiled-the-political-calculations-of-bjp/