प्रधानमंत्री मोदींनी केले नवीन कॅम्पसचे उद्घाटन
संपूर्ण जगात शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेले नालंदा विद्यापीठ
तब्बल 800 वर्षांनंतर पुन्हा जिवंत झाले आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
17 देशांच्या सहकार्याने, भारत सरकारने राजगीरजवळ नालंदा विद्यापीठाचे नवीन कॅम्पस बांधले,
ज्याचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर,
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि 17 देशांचे राजदूत आणि इतर अनेक पाहुणे उपस्थित होते.
नालंदा विद्यापीठाचे नवे कॅम्पस अनेक अर्थाने खास आहे,
ज्यामध्ये परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या
नवीन कॅम्पसच्या बांधकामात सहकार्य करणाऱ्या सर्व देशांचे आभार मानले.
ते आपल्या भाषणात म्हणाले की,
नालंदा हे केवळ भारताचे पुनर्जागरण नाही,
अनेक देशांचा वारसा तिच्याशी जोडला गेला आहे.
नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बाधणीत भागीदार देशांनीही सहभाग घेतला आहे.
वास्तविक, 2007 मध्ये झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेदरम्यान,
प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनावर चर्चा झाली होती.
यानंतर भारताच्या तत्कालीन यूपीए सरकारने 2010 मध्ये
नालंदा विद्यापीठ कायदा संमत केला.
2014 मध्ये केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर
तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 19 सप्टेंबर 2014 रोजी
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसची पायाभरणी केली.
तब्बल 9 वर्षानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजरोजी या कॅम्पसचे उद्घाटन केले.
नालंदा विद्यापीठ राजगीर या ऐतिहासिक शहराच्या पाच टेकड्यांपैकी एक असलेल्या
वैभरगिरीच्या पायथ्याशी बांधले गेले आहे.
सुमारे 455 एकर परिसरात पसरलेल्या नवीन कॅम्पसमध्ये 1750 कोटी रुपये खर्चुन
नवीन इमारती आणि इतर सुविधा बांधण्यात आल्या.
सध्या या कॅम्पसचे काम सुरू आहे.
नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 24 इमारती आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नालंदा युनिव्हर्सिटीच्या नवीन कॅम्पसचा परिसर
अतिशय मनमोहक आहे.
या संकुलाचा एक चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे.
विविध इमारतींभोवती जलाशय निर्माण झाले आहेत.
जे बिहारच्या पारंपारिक अहर पेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमवर आधारित आहे.
म्हणजेच परंपरेसोबत आधुनिकतेचा संगम या कॅम्पसमध्ये पाहायला मिळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/the-offer-received-from-tdpl-india-aghadi-for-the-post-of-lok-sabha-speaker-has-spoiled-the-political-calculations-of-bjp/