‘कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त हितसंबंध कायम राहतात’ – संरक्षण मंत्री
नवी दिल्ली -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के
करवाढीच्या धमक्यांमुळे जागतिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान
करत जागतिक व्यापार, संरक्षण आणि भारताच्या स्वावलंबनावर भाष्य केले.
राजनाथ सिंह म्हणाले की,
“कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त हितसंबंध कायम राहतात.
जागतिक व्यापार युद्धाच्या दिशेने जात आहे.
परंतु भारत आपल्या राष्ट्रीय हितांशी तडजोड करणार नाही.”
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनावर भर
एनडीटीव्ही डिफेन्स समिटमध्ये भाषण करताना राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की,
संरक्षण क्षेत्रात परदेशी देशांवर अवलंबून राहणे आता शक्य नाही.
पुढील १० वर्षांत ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण प्रणाली
देशभरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी उभारली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, ही आधुनिक सुरक्षा व्यवस्था शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकेल.
“ऑपरेशन सिंदूर” दरम्यान हवाई सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले होते,
त्यानंतर हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
मोदींच्या स्वातंत्र्यदिन भाषणाशी संदर्भ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त या हवाई संरक्षण प्रकल्पाची घोषणा केली होती.
पाकिस्तानकडून सीमेवरील भारतीय मालमत्तांना धोका असल्याचे संकेत आल्यानंतर हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरतो, असेही संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले.
अर्थव्यवस्था व सुरक्षा एकमेकांशी निगडित
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, संरक्षण क्षेत्र केवळ
सीमांचे रक्षण करण्यापुरते मर्यादित नसून ते देशाच्या संपूर्ण आर्थिक
रचनेच्या सुरक्षिततेची जबाबदारीही पार पाडत आहे.
स्वावलंबन म्हणजे संरक्षणवाद नव्हे, तर तो सार्वभौमत्व,
राष्ट्रीय स्वायत्तता आणि आत्मविश्वासाचा प्रश्न आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या भाषणानंतर स्पष्ट झाले की, भारताने जागतिक तणावात आपले राष्ट्रीय हित,
स्वावलंबन आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/akolid-krida-week-bhuti-repacle/