महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही
वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.महाकुंभ मेळ्यादरम्यान मौनी अमावस्येनिमित्त
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला आहे. अमृत स्नानसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली आहे.
ही गर्दी इतकी जास्त होती की, काही क्षणातच चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक
जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णवाहिकेने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.
मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून
भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे.
महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
आतापर्यंत कुठूनही मृत्यूची बातमी नाही. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
महाकुंभात देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा ओघ सुरूच आहे.
आज मौनी अमावस्या आहे. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी आहे.
त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी सुमारे 10 कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे.
अशात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नानचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांमध्ये परत बोलावल्या आहेत.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवलं जात आहे.
जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाकुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातून देखील हजारो भाविक प्रयागराजला दाखल झाले आहेत.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त अखिल भारतीय वारकरी
संप्रदाय खालसा (माऊली धाम ) मध्ये सुरक्षित आहेत. श्री रघुनाथ महाराज (देवबाप्पा) फरशीवाले
बाबा यांच्या आखाड्यात सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्त सुरक्षित आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/betel-nut-and-suicide-rajyaat-kuthe-ghadlya-3-gales/