मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशाल मोर्चा काढत सरकारला थेट इशारा दिला —
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
“जर सरकार बधत नसेल, तर प्रहारच्या मशालीचा उजेड थेट विधानसभेत पोहोचेल!”
मुर्तीजापुर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश ‘अप्पा’ पिंपळे यांच्या जनसंपर्क
कार्यालयावर रात्री साडेअकराच्या सुमारास आक्रमक मोर्चा दाखल झाला. हातात पेटलेल्या मशाली,
निळे दुपट्टे, आणि “शेतकऱ्यांचा जयजयकार – सरकारला धक्का देणार!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रहारची ठाम मागणी:
प्रहार तालुका अध्यक्ष अक्षय अनिल वैराळे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी
पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून द्यावा
दिव्यांग बांधवांना दरमहा ₹६००० मानधन मंजूर करावे
‘हे सरकार झोपले आहे!’ – प्रहारचा सवाल
“दररोज सात शेतकरी आत्महत्या करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्याला अजूनही झापडं लागली आहेत!
निवडणुकीआधी ‘शेतकऱ्यांचे पुत्र’ म्हणून मिरवणारे आज गप्प का?” असा थेट सवाल प्रहारने उपस्थित केला.
यावेळी अक्षयभाऊ वैराळे, नारायणभाऊ लोखंडे, संदीप चव्हात, प्रल्हाद मालळकर, पुडलिंग धंदरे,
तुषार लोखंडे, रामेश्वर खुळे, पंकज आंधळे, विठ्ठल घुगे, रणजीत लोखंडे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्तात आंदोलन
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणेदार अजित जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश सूर्यवंशी, आशिष शिंदे आणि पवार साहेब यांनी भक्कम पोलीस बंदोबस्त ठेवला.
महात्मा फुले व आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र
प्रहारने स्पष्ट केलं की ही लढाई “शेतकऱ्याच्या जिवाची आणि दिव्यांगाच्या हक्काची” असून येत्या
महात्मा फुले जयंती (११ एप्रिल) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) या काळात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
“हातात मशाल, ओठांवर घोषणा आणि मनात अन्यायाविरुद्धची चीड – प्रहारचं हे आंदोलन सरकारला झोपेतून जागं करणार!”
Read Also :