पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा
ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम
पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
मार्गाचा उद्धाटन करण्यात आले. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे
हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार होणार आहे. दक्षिण मुंबईपासून
वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, वेगवान प्रवास आता या
रस्त्यामुळे शक्य होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट
झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून
सुटका होणार आहे. आता या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंनी जनतेशी संवाद साधला. “आपण कोस्टल हायवे सुरु केलेला
आहे. आता तर तो सिलिंकलाही जोडला आहे. यामुळे आता मरीन
ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचे अंतर अवघ्या दहा मिनिटात मुंबईकरांना गाठता
येणार आहे. यामुळे मुंबईकरांना अतिशय सुखकर आणि जलद प्रवास
करण्याची संधी मिळेल. लोकांचा वेळ, इंधन वाचेल. तसेच प्रदूषणही
कमी होईल. लोक घरी व कार्यालयात वेळेत किंवा लवकर पोहोचतील
आणि घरी जास्त वेळ ही देऊ शकतील. मुंबईसाठी हा गेम चेंजर प्रकल्प
आहे. त्यानंतर हा रोड पुढे वर्सोव्याला जोडला जाईल आणि त्यानंतर वर्सोवा
ते विरार हा प्रकल्प देखील आम्ही पुढे नेत आहोत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/traffic-disrupted-in-some-areas-of-delhi-due-to-rain/