विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक
मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा
करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा
वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.
आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टोलमाफीचा निर्णय
जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली
आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या
आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी
राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता
घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला
हवी”, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
दरम्यान मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी
दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू
असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि
एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.
मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच
झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/major-decision-regarding-dharavi-redevelopment-in-cabinet-meeting/