मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची
सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड
स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या
यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल
होताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे
मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे
येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम
रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे.
त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा
झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर
स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या
बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने
धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.
दरवर्षी दिवाळी आणि छट पुजेसाठी लाखो उत्तर भारतीय मुंबईतून
उत्तर प्रदेशला जात असतात. मुंबईहून उत्तर प्रदेशात
जाण्यासाठीच्या अनेक गाड्या या पश्चिम रेल्वेमार्गे धावतात. यामुळे
रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले
आहे. उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात
आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष
गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केळवे स्थानकात झालेल्या
तांत्रिक गोंधळामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागला
आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना
त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले
आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/12-fishermen-from-tamil-nadu-caught-by-sri-lankan-navy/