मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची
सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम
Related News
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड
स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या
यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल
होताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे
मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे
येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम
रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे.
त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा
झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर
स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या
बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने
धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.
दरवर्षी दिवाळी आणि छट पुजेसाठी लाखो उत्तर भारतीय मुंबईतून
उत्तर प्रदेशला जात असतात. मुंबईहून उत्तर प्रदेशात
जाण्यासाठीच्या अनेक गाड्या या पश्चिम रेल्वेमार्गे धावतात. यामुळे
रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले
आहे. उधना ते गोरखपूर यादरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात
आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यंत या विशेष
गाड्या रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केळवे स्थानकात झालेल्या
तांत्रिक गोंधळामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क लागला
आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना
त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले
आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/12-fishermen-from-tamil-nadu-caught-by-sri-lankan-navy/