केंद्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा
योजना (पीएमएमवाय) अंतर्गत कर्ज मर्यादा दुपटीने वाढवून २०
लाख रुपये केल्याचे शुक्रवारी अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले. अर्थमंत्री
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये मांडलेल्या २०२४-२५ च्या
अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. ज्या उद्योजकांनी याआधी
‘तरुण श्रेणी’ अंतर्गत मागील कर्जाचा लाभ घेतला आणि
यशस्वीपणे कर्जाची परतफ ड केली त्यांच्यासाठी मुद्रा कर्जाची
मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली
जाईल, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून घोषित केले होते.
यामुळे एकूण उद्योजकता परिसंस्थेला चालना मिळावी आणि त्यात
तरुणांचा सहभाग वाढावा या उद्देशाने केंद्र सरकारने या योजनेच्या
मर्यादेत वाढ केली आहेउद्योजकांना २० लाखांपर्यंतच्या मुद्रा
योजनेंतर्गत कर्जाची हमी ‘कव्हरेज क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो
युनिट्स’ अंतर्गत प्रदान केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८
एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजनेस सुरुवात केली.
त्याअंतर्गत बिगर कंपनी (नॉन-कॉर्पो रेट), बिगर-शेती लघु/सूक्ष्म
उद्योगांना कर्ज उपलब्ध करून वितरण सुरू आहे. योजनेनुसार,
बँका तीन श्रेणींमध्ये सध्या कमाल १० लाख रुपयांपर्यंत
तारणमुक्त कर्ज देतात. यामध्ये शिशु (५०,००० रुपयांपर्यंत),
किशोर (५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत) आणि तरुण ५ लाख ते
१० लाख रुपयांपर्यंत) श्रेणीचा समावेश होतो. ‘तरुण श्रेणी’ अंतर्गत
मागील कर्जाचा लाभ घेऊन कर्जाची परतफेड करणाऱ्या
लाभार्थ्यांना आता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/the-worst-attack-in-iranwar-history/