जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु
आहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे.
काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स
Related News
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — मुर्तीजापुर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या
घटनांनी नागरिकांना अक्षरशः हैराण करून टाकले आहे. मात्र आता या चोरीच्या
सत्राला लगाम ...
Continue reading
आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व युती केली आहे. भाजप येथे एकटा
लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये
मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कलम ३७०
आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कलम ३७० हटवण्याचे श्रेय भाजप घेत
आहे. हे कलम आता इतिहासजमा झाला आहे. ते कधीच परत येऊ शकत
नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स आपल्या
अधिकारात नसतानाही कलम ३७० पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत
आहे. अशातच निवडणुकीत उतरलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री
मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे
विधान केलं आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा विधानसभा
मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी
देण्यात आली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत
महत्त्वाचे विधान केलं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,
असं रोखठोक विधान इल्तिजा मुफ्ती यांनी केलं आहे. “जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय
कुटुंबात वाढता तेव्हा बाहेरचे लोक म्हणतात की तू पुढची मुख्यमंत्री असणार
आहेस. याने मला खूप चांगले वाटेल असं लोकांना वाटतं. पण हे एक काटेरी मुकूट आहे.
जेव्हा तुम्ही त्या पदावर जाता तेव्हा तुमची शक्ती कमी होते. लोक म्हणतात की,
तुम्ही पुढच्या मुख्यमंत्री होणार आहात तेव्हा मला ती प्रशंसा वाटत नाही. मला खूप
पुढे जायचं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही. आमचा
स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, आमचे कायदे होते. कलम ३७० आम्ही पुन्हा आणू,”
असं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. “मी इतक्या गावात जाते की तिथल्या लोकांना
पिण्याच्या पाण्याची जोडणी किंवा रस्ते नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांचा आग्रह मी मान्य
केला आहे. मी थोडी दबंग प्रकारची आहे, मेहबूबा मुफ्ती भावनिक आहेत. तुम्ही
राजकारणात गेलात तर सर्वांचे ऐकून घ्याल आणि काम कराल, असे लोकांनी मला
सांगितले,” असंही इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/reservation-cannot-be-achieved-by-anyone-ramdas-athawale/