पावसाळ्यात अशी राखा केसांची निगा..

मान्सून

देशासह महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय,

पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणासोबत

Related News

अनेक आजारांच्या समस्या देखील वाढतात.

या सोबतच पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्याही वाढतात.

अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो.

पावसाळ्यात केसांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते,

ज्याबद्दल अनेकांना माहित नसते.

पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात.

या दिवसात हवेत ओलावा असतो,

त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा होणे

किंवा केस गळणे अशा समस्या दिसून येतात.

पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे.

केसांची मुळे मजबूत करण्याचा हा उत्तम उपाय आहे आणि स्कॅल्पही निरोगी ठेवतो.

यासाठी रात्री तेलाने मसाज करा

आणि सकाळी चांगल्या शाम्पूने केस धुवा.

हवेतील जास्त आर्द्रतेमुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात.

अशा परिस्थितीत शॅम्पूनंतर कंडिशनर करणं सोडू नका,

कारण ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.

कारण कंडिशनिंग केल्याने केस फ्रिज राहत नाही तर केसांना कोरडेही होत नाहीत.

अनेकांना फक्त ओले केस विंचरण्याची सवय असते.

अशा परिस्थितीत, तुम्ही कितीही घाई करत असलात तरी, हे करणे टाळा,

कारण यामुळे केसांतील भांग कमकुवत होतात आणि केस गळतीला अधिक चालना मिळते.

केवळ तेल लावणे, केस धुणे किंवा कंडिशनिंग आवश्यक नाही

तर केस गळण्यात तुमचा टॉवेल देखील मोठी भूमिका बजावतो.

होय, जर तुम्ही ओले केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेल वापरत असाल

तर तुम्ही हे देखील टाळले पाहिजे.

विशेषतः पावसाळ्यात मायक्रो टॉवेलचा वापर तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.

Read also: पित्ताचा त्रास होतोय? करा ‘हे’ घरगुती उपाय लगेच मिळेल आराम (ajinkyabharat.com)

Related News