पुणे : ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत असे काही ‘भटकते आत्मे’ आहेत. आपला महाराष्ट्र देखील याचा शिकार झालाय. आजपासून ४५ वर्षांआधी या खेळाला सुरूवात केली. १९९५ मध्ये आलेल्या युतीच्या सरकारला हाच भटकता आत्मा अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. हा आत्मा फक्त विरोधकच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि आपल्या घरात पण असेच करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर असतानाच मोदींनी शरद पवार यांचा ‘भटकता आत्मा’ असा उल्लेख केल्याने बारामतीसह महाराष्ट्रात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीकेमुळे लोकसभा निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
पुणे, बारामती, शिरूर आणि मावळमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभा पार पडली. या सभेला जिल्ह्यातील महायुतीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. पुण्यातील सभेला संबोधित करताना गेल्या १० वर्षातील विकासकामांची जंत्री सांगत मोदींनी विरोधकांनाही लक्ष्य केले. यावेळी त्यांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळविला.
ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाही
ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाही, त्यांच्यामध्ये खोडा घालण्याचे काम करतात. आजपासून ४५ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी इथल्या एका बड्या नेत्याने (शरद पवार) अस्थिरतेच्या खेळाला सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. केवळ विरोधकच नव्हे तर आपल्या पक्षात आणि कुटुंबालाही अस्थिर करण्याचे प्रयत्न आत्मा करत असतो, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता चढवला.
Related News
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भा...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाक...
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले....
Continue reading
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुप आज वाजलं. तीन दिवस चाललेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय फटकेबाजी रंगली.
साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री अजित पवा...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी डिजिटल सेवा कर लादणाऱ्या देशांमधून
आयात केलेल्या वस्तूंवर टॅक्स (शुल्क) लावण्याचे आदेश दिले आहेत,
ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्...
Continue reading
पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान
भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.
पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घे...
Continue reading
नरेंद्र राणे परतणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत?
नरेंद्र राणे यांच्या पक्ष प्रवेशाच्या घडामोडी सध्या चर्चेचा विषय बनलेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रव...
Continue reading
पवार कायम अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात
“शिवसेना भारतीय जनता पक्षाचे १९९५ साली राज्यात सरकार आले. परंतु काही दिवसांतच ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न या आत्म्याने सुरू केले. अगदी आत्ताही २०१९ साली राज्यातील जनतेच्या जनादेशाविरोधात जाऊन त्यांनी जनतेचा अपमान केला. सध्या केवळ महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून हे थांबत नाहीत देशात कशी अस्थिरता निर्माण होईल, याचा प्रयत्न ते करतात”, अशी टीकाही मोदी यांनी केली.