अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस
यांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही,
अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
Related News
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी खासदार संजय राऊत
बुधवारी अकोला जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार राऊत म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला.
महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आगामी निवडणुक लक्षात घेता महायुती सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली.
लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचे सरकार आल्यावर या योजनेचे पैसे
आम्ही वाढविणार आहेत. सध्या महायुती सरकारकडून शिवसेना आमदार नितीन देशमुख
यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. देशमुख हे सुरत येथुन मोदी-शहांच्या
तुरूंगाच्या भिंती फोडून आले. ते 50 खोक्यांना विकल्या गेले नाहीत,
म्हणून त्यांच्या मागे चौकश्या लावून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करीत आहे.
महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेच्या आमदार,
पदाधिकाऱ्यांना चौकशींचा धाक दाखवून त्रास दिल्या जातोय.
त्यांना काय चौकश्या करायच्या करू द्या, आम्ही त्यांना घाबरत नसल्याचे खासदार राऊत म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/help-farmers-by-declaring-hail-drought/