नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण
बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते.
त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात कमवायला गेली आहेत.
Related News
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
मोबाईलमुळे नवरा-बायकोच्या नात्यात वितुष्ट आल्याची, वाद झाल्याच्या अनेक बातम्या
तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्याच देशात एक असं गाव आहे, जिथे मोबाईलमुळे तरूणांचं लग्नच होत नाहीये.
उत्तर प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई ब्लॉकमधील नायगावचा हा भाग आहे.
नायगाव हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारे वनगाव आहे.
येथे अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. आपल्या मुलीचे या गावातील तरूणांशी लग्न लावून द्यायला कोणीच तयार नाही.
त्याचे कारण म्हणजे मोबाईल नेटवर्कचा अभाव.
2025 साली टेक्नॉलॉजीमध्ये एवढे बदल झालेत, जग एवढं पुढे गेलं आहे तरी भारतातल्या या
नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण
बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते.
त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात पैसे कमवायला बाहेर पडली आहेत.
तरूणांचा लग्न रखडलं
या गावातील रहिवासी श्यामाबाई त्यांच्या 29 वर्षांच्या मुलाच्या लग्नामुळे चिंतेत आहेत.
खूप त्रास होतो. कोणीच आम्हाला मुलगी देत नाही. येथे नेटवर्क उपलब्ध नसल्याची मुलीच्या कुटुंबियांना चिंता असते.
फोन लागत नाही. माझ्या दोन मुलांची तर लग्न झाली, पण धाकटा मुलगा आता 29 वर्षांचा झाला तरी त्याचं लग्न जुळेना.
त्याच्या लग्नात बऱ्याच अडचणी येत आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे कोणीच त्यांच्या मुलीची
आमच्याशी सोयरीक करायला तयटार नाही, अशी समस्या श्यामाबाई यांनी सांगितली.
त्याच गावातील दुलम सिंग कुंजम यांचीही तीच तक्रार आहे. इंटरनेट कनेक्शन नाही,
त्यामुळे कोणीही मुलगी देऊ इच्छित नाही. ही समस्या प्रत्येकाला सतावत आहे.
आम्ही लग्नासाठी मुलगी शोधत आहोत, पण कोणीच या गावात मुलगी द्यायला तयार नाही.
आम्ही आमच्या मुलीशी कसे बोलणार? प्रत्येक पालकांचा हा सवाल आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रसूतीच्या वेळी रुग्णवाहिका बोलावण्यासाठीही लांब जावे लागते.
‘रिचार्ज तर होतं पण फोन वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर करावी लागते तंगडतोड
नेटवर्क नसल्यामुळे गावातील तरुण सर्वाधिक संतप्त आणि नाराज आहेत. 29 वर्षीय चैतालाल उईके यांच्या सांगण्यानुसार,
गावात इथे नेटवर्क नाही आणि आजच्या काळात मोबाईलशिवाय आयुष्य चालू शकत नाही. सर्वत्र नेटवर्क असावे.
मोबाईल रिचार्ज करतो आम्ही पण तो वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर तंगडतोड करावी लागते.
मुलंही ऑनलाईन शिकू शकत नाहीत. एखाद्याला इमरजन्सीमध्ये आमच्याशी बोलण्याची गरज भासली,
कुणाचा मृत्यू झाला तरी इथे फोन येणार नाही. लोक तक्रार करतात, तेव्हा ते (अधिकाी) म्हणतात की हे फॉरेस्ट
डिपार्टमेंटचे गाव असेल तर नेटवर्तक येऊ शकणार नाही. बांधकाम होऊ शकणार नाही. ते बांधले जाणार नाही.
बीएसएनएल कडून लावण्यात येणार टॉवर
सुमारे 650 लोकसंख्या असलेल्या या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षकांचे काम रखडते.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह यांनी सांगितले की,
केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कव्हरेज नसलेल्या गावांसाठी बीएसएनएल टॉवर्स बसवत आहे.
काही दिवसांपूर्वी चार गावांमध्ये टॉवर बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात या गावाचे नाव येऊ शकते, असे त्यांनी नमूद केलं.
Read more news here :https://ajinkyabharat.com/akola-chachaya-shop/