नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण
बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते.
त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात कमवायला गेली आहेत.
Related News
मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
...
Continue reading
दिल्ली |
मॉडेल टाउन: राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.
माचिस न दिल्यामुळे बाबू नावाच्या तरुणाने दोन व्यक्तींना पाठलाग करत
क्रूरपणे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आह...
Continue reading
मुंबई |
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना
(UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी
...
Continue reading
मुंबई प्रतिनिधी |
मुंबईतील भांडुप परिसरातील झिया अन्सारी या कुख्यात गुंडाने आपल्या वाढदिवसाचा अनोख्या
पद्धतीने जल्लोष साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अलीकडेच जेलमध...
Continue reading
पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरल...
Continue reading
सुनील साकेत | आग्रा (उत्तर प्रदेश)
आग्रा शहरातील स्टेशन रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये
घटतौलीची तक्रार करणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले.
ग्राहकाने केवळ 5 ल...
Continue reading
उमरा (ता. अकोट, जि. अकोला) | प्रतिनिधी – रामेश्वर कावरे, अजिंक्य भारत
उमरा गावात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ८ दिवसांचे
प्रशिक्षण शिबिर आयोजि...
Continue reading
नोएडा प्रतिनिधी |
नोएडाच्या सेक्टर-33 येथील इस्कॉन मंदिराजवळील एलिवेटेड रोडवर एका तरुणाने
थार गाडीच्या छतावर चढून मोठ्या आवाजात म्युझिक लावून डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.
...
Continue reading
हैदराबाद प्रतिनिधी |
हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक आगीचा मोठा प्रसंग घडला.
ही घटना त्या हॉटेलमध्ये घडली आहे जिथे आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे ख...
Continue reading
मुंबई प्रतिनिधी |
भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.
मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इम...
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक.
त्यांच्या विचारांनी पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेतली. याच महामानवाची जयंती १४ एप्रिल रोजी शेकापूर फाटा
...
Continue reading
मूर्तिजापूर |
तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (१२ एप्रिल) एक हृदयद्रावक घटना घडली.
सुधाकर वामनराव ठाकरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू...
Continue reading
मोबाईलमुळे नवरा-बायकोच्या नात्यात वितुष्ट आल्याची, वाद झाल्याच्या अनेक बातम्या
तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्याच देशात एक असं गाव आहे, जिथे मोबाईलमुळे तरूणांचं लग्नच होत नाहीये.
उत्तर प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई ब्लॉकमधील नायगावचा हा भाग आहे.
नायगाव हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारे वनगाव आहे.
येथे अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. आपल्या मुलीचे या गावातील तरूणांशी लग्न लावून द्यायला कोणीच तयार नाही.
त्याचे कारण म्हणजे मोबाईल नेटवर्कचा अभाव.
2025 साली टेक्नॉलॉजीमध्ये एवढे बदल झालेत, जग एवढं पुढे गेलं आहे तरी भारतातल्या या
नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण
बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते.
त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात पैसे कमवायला बाहेर पडली आहेत.
तरूणांचा लग्न रखडलं
या गावातील रहिवासी श्यामाबाई त्यांच्या 29 वर्षांच्या मुलाच्या लग्नामुळे चिंतेत आहेत.
खूप त्रास होतो. कोणीच आम्हाला मुलगी देत नाही. येथे नेटवर्क उपलब्ध नसल्याची मुलीच्या कुटुंबियांना चिंता असते.
फोन लागत नाही. माझ्या दोन मुलांची तर लग्न झाली, पण धाकटा मुलगा आता 29 वर्षांचा झाला तरी त्याचं लग्न जुळेना.
त्याच्या लग्नात बऱ्याच अडचणी येत आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे कोणीच त्यांच्या मुलीची
आमच्याशी सोयरीक करायला तयटार नाही, अशी समस्या श्यामाबाई यांनी सांगितली.
त्याच गावातील दुलम सिंग कुंजम यांचीही तीच तक्रार आहे. इंटरनेट कनेक्शन नाही,
त्यामुळे कोणीही मुलगी देऊ इच्छित नाही. ही समस्या प्रत्येकाला सतावत आहे.
आम्ही लग्नासाठी मुलगी शोधत आहोत, पण कोणीच या गावात मुलगी द्यायला तयार नाही.
आम्ही आमच्या मुलीशी कसे बोलणार? प्रत्येक पालकांचा हा सवाल आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रसूतीच्या वेळी रुग्णवाहिका बोलावण्यासाठीही लांब जावे लागते.
‘रिचार्ज तर होतं पण फोन वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर करावी लागते तंगडतोड
नेटवर्क नसल्यामुळे गावातील तरुण सर्वाधिक संतप्त आणि नाराज आहेत. 29 वर्षीय चैतालाल उईके यांच्या सांगण्यानुसार,
गावात इथे नेटवर्क नाही आणि आजच्या काळात मोबाईलशिवाय आयुष्य चालू शकत नाही. सर्वत्र नेटवर्क असावे.
मोबाईल रिचार्ज करतो आम्ही पण तो वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर तंगडतोड करावी लागते.
मुलंही ऑनलाईन शिकू शकत नाहीत. एखाद्याला इमरजन्सीमध्ये आमच्याशी बोलण्याची गरज भासली,
कुणाचा मृत्यू झाला तरी इथे फोन येणार नाही. लोक तक्रार करतात, तेव्हा ते (अधिकाी) म्हणतात की हे फॉरेस्ट
डिपार्टमेंटचे गाव असेल तर नेटवर्तक येऊ शकणार नाही. बांधकाम होऊ शकणार नाही. ते बांधले जाणार नाही.
बीएसएनएल कडून लावण्यात येणार टॉवर
सुमारे 650 लोकसंख्या असलेल्या या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षकांचे काम रखडते.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह यांनी सांगितले की,
केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कव्हरेज नसलेल्या गावांसाठी बीएसएनएल टॉवर्स बसवत आहे.
काही दिवसांपूर्वी चार गावांमध्ये टॉवर बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात या गावाचे नाव येऊ शकते, असे त्यांनी नमूद केलं.
Read more news here :https://ajinkyabharat.com/akola-chachaya-shop/