राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारी
विधानभवनात शपथ घेतली. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांऐवजी सात
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
आमदारांची नियुक्ती करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी करत
ठाकरे गटाने याविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र
हायकोर्टाने या शपथविधीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
कोर्टाने सात आमदारांच्या नियुक्तीला स्थगितीस नकार देत या
नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे
स्पष्ट केले. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी
महायुती सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल नियुक्त
आमदारांमध्ये वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला संधी दिल्याचा
आरोप संजय राऊत यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी
आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी विधान परिषदेवर
राज्यपाल नियुक्त सात आमदारांची नियुक्ती करण्यात आली.
भाजपचे विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, चित्रा वाघ,
शिंदेसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे, अजित पवार गटाचे पंकज
भुजबळ, इद्रिस नायकवडी यांना उपसभापती नीलम गोऱ्ह यांनी
सदस्यत्वाची शपथ दिली. या शपविधीवरुन ठाकरे गटाचे खासदार
संजय राऊत यांनी टीका केली. विधानपरिषद आमदार नियुक्ती
संदर्भात हायकोर्टात याचिका असताना घाई घाईनं आचारसंहिता
जाहीर होण्यापूर्वी शपथविधी करण्यात आला. आमदारांची
नियुक्ती घटनाबाह्य आहे. ठाकरे सरकारनं पाठलेली यादी
राजभवनात प्रलंबित होती. राज्यपालांनी या नियुक्त्या करताना
कोणती विशेष माहिती घेतली, असा सवाल संजय राऊत यांनी
केली. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून इद्रिस
नायकवडी यांना संधी दिल्यामुळेही राऊतांनी भाजपवर टीकास्त्र
डागलं. “इद्रिस नायकवडी या सांगली महापालिकेत वंदे
मारतमरला विरोध करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त
आमदार करता. आता तुमचा हिंदुंचा गब्बर कुठे आहे? हिंदुत्वाची
भाषा करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत. वंदे मातरमला विरोध
करणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि
त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. भंपक लोकं आहात.
हिंदुत्ववादी संघटनेच्या नायकवडी यांनी कार्यालयावर हल्ला केला
होता. तुमची काय नियत आणि निती आहे हे आम्हाला सागा.
अजून सुद्धा इतर सहा जणांच्या कुंडल्या मी काढू शकतो. तुम्ही वंदे
मातरमला विरोध केलेल्या व्यक्तीला आमदार केलं आहे हे
महाराष्ट्राला सांगायचे आहे. आता तुम्हाला हिंदुत्व आणि
राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचे अधिकार नाहीत,” असं संजय
राऊत म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/government-increased-da-diwali-gift-to-crores-of-employees/