आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने महाविकास आघाडीतील प्रमुख
नेत्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मुंबईतील १२ हिंदी भाषिक
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
प्राबल्य असलेल्या मतदारसंघात हिंदी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना
उमेदवारीत प्राधान्य द्या अशी मोठी मागणी करण्यात आली आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्याकडे
पत्र लिहून ही मागणी राष्ट्रवादीचे मुंबई प्रवक्ते आणि हिंदी भाषा विभागाचे
अध्यक्ष मनीष दूबे यांनी केली आहे. मनीष दूबे यांनी लिहिलेल्या पत्रात
म्हटलंय की, मुंबईतील दहिसर, कांदिवली, मालाड, वर्सोवा, कलिना,
अणुशक्तीनगर, दिंडोशी, शिवाजीनगर, वांद्रे पूर्व, कुर्ला, मागाठाणे,
अंधेरी पूर्व आणि इतर मतदारसंघात परराज्यातून आलेली लोकसंख्या
मोठ्या प्रमाणात आहे. ही लोकसंख्या अनेकदा राजकीय प्रतिनिधित्वापासून
वंचित राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्या समस्येचं आणि मुद्द्यांचे निरसन
होत नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीकडून या
मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी
केली. तसेच या उमेदवारांमुळे परराज्यातील लोकांना राजकीय प्रतिनिधित्वासह
त्यांचा आवाज प्रभावीपणे विधानसभेत पोहचवण्यासाठी मदत होईल.
त्याशिवाय समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळेल. हिंदी भाषिक
उमेदवाराची निवड ही एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल ठरेल
ज्यातून या मतदारसंघातील समस्यांना प्राधान्य मिळून त्यांचा आवाज
उठवला जाईल. मविआच्या नेतृत्वात हा निर्णय सर्वसमावेशक निती आणि
धोरण मजबूत करेल अशी अपेक्षा मनीष दूबे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान,
आम्ही दिलेल्या या पत्राचा आपण गांभीर्याने विचार कराल आणि या
मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवारांना संधी देऊन न्याय आणि समतेला
प्रोत्साहन द्याल. हिंदी भाषिकाला उमेदवारी दिली तर ते मतदार महाविकास
आघाडीसोबत जोडले जातील.
Read also: https://ajinkyabharat.com/one-day-state-mourning-declared-in-the-state-on-the-demise-of-ratan-tata/