गावामध्ये १०० टक्के सौर ऊर्जीकरण
सौर उर्जेच्या वापरासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होत असताना
महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
हे राज्यातील पहिले सौरग्राम झाले आहे. गावामध्ये ‘महावितरण’च्या वतीने
१०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे.
राज्यातील पहिले ‘सौर ग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या
कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस,
पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र,
मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे
उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील
मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे.
या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो.
सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे
घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल
त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना
१० टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून
साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे.
उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री
शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून
पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी
योजना व मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/gautami-patilla-land-approved/