बालेकिल्ल्यात भुजबळांना कॉलर उडवत इशारा
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच
नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची
जोरदार तयारी केली होती. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील
मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली.
तपोवन जुना आडगाव नाका -निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत
पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील
यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे
छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच,
आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचं पाहायला मिळालं.
मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आज
उदयनराजेस्टाईल कॉलर उडवून दाखवली. नाशिकमधील मराठा समाजाने
आज कॉलर टाईट केली आहे, असं म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही
कॉलरला हात लावून दाखवला. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे,
नाशिकवर भुजबळाचं नाव लिहिलंय का, भुजबळ अन् फडणवीस यांना
राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी
पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ
यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, निडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार,
आगामी विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून
पुढचं सरकार आमचंच येणार, असे भाकीतही मनोज जरांगे यांनी केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/japanese-scientists-give-hint-about-great-earthquake/