बालेकिल्ल्यात भुजबळांना कॉलर उडवत इशारा
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच
नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे.
Related News
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची
जोरदार तयारी केली होती. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील
मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली.
तपोवन जुना आडगाव नाका -निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत
पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील
यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे
छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच,
आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचं पाहायला मिळालं.
मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आज
उदयनराजेस्टाईल कॉलर उडवून दाखवली. नाशिकमधील मराठा समाजाने
आज कॉलर टाईट केली आहे, असं म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही
कॉलरला हात लावून दाखवला. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे,
नाशिकवर भुजबळाचं नाव लिहिलंय का, भुजबळ अन् फडणवीस यांना
राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी
पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ
यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, निडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार,
आगामी विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून
पुढचं सरकार आमचंच येणार, असे भाकीतही मनोज जरांगे यांनी केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/japanese-scientists-give-hint-about-great-earthquake/