गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे…
ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व
निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने
राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून
सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार?
आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.
निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले.
तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी
निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.
विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा
निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत.
त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे,
खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे.
निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.
Read Also https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/