मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उगवलेले अंकुराचे पीक पाण्याखाली गेले आहे.
Related News
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
धामणगाव (गो.) येथे शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष
गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या होत्या.
काहींनी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत तयारी ठेवली होती.
मात्र, मध्यरात्रीपासून झालेल्या धो-धो पावसामुळे नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी बियाणं, खत वाहून गेलं आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्याने दुबार पेरणीची वेळ आली असून त्यात आर्थिक खर्चही वाढला आहे.
२६ जून रोजीही पेरण्या पूर्णतः अडकल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.