मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू लवकरच भारताच्या
दौऱ्यावर येणार आहेत. मुइझू यांच्या भारत दौऱ्याविषयी त्यांच्या
प्रवक्त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
टिप्पणी केल्याबद्दल जानेवारीमध्ये निलंबित करण्यात आलेल्या
दोन मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला त्याच दिवशी प्रवक्त्या
हीना वलीद यांनी मुइज्जू यांच्या भारत भेटीची घोषणा केली होती.
हीना वलीद यांनी म्हटले की, या भेटीची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही.
दोन्ही देशांच्या नेत्यांसाठी सोयीस्कर अशा तारखेबाबत दोन्ही पक्ष चर्चा करत
आहेत. पत्रकार परिषदेत हीना वलीद यांनी म्हटले की, “राष्ट्रपती लवकरच
भारत दौऱ्यावर असणार आहेत. अशा भेटी दोन्ही देशांच्या नेत्यांसाठी सोयीस्कर
अशा वेळी आयोजित केल्या जातात. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जाणारे मोहम्मद मुइझू हे 9 जून रोजी
पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्लीत उपस्थित होते.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ऑगस्टमध्ये मालदीवला गेले होते. मुइझ्झू यांनी गेल्या
वर्षी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर भारताचे मालदीवशी संबंध तणावपूर्ण झाले.
त्यांच्या शपथविधीच्या काही तासांतच त्यांनी मालदीवला भारताने भेट दिलेल्या तीन
विमान वाहतूक प्लॅटफॉर्मवर तैनात केलेल्या भारतीय लष्करी जवानांना परत जाण्यास
सांगितले होते. दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर भारतीय लष्करी जवानांची जागा तेथील कर्मचाऱ्यांनी
घेतली होती. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान
मोदींबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या मंत्र्यांच्या टिप्पण्यांना वैयक्तिक ठरवत प्रशासनाला
त्यांपासून दूर केले होते. मालदीव सरकारच्या त्या मंत्र्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत
नाहीत असे ट्विट करण्यात आले होते.