मध्य प्रदेशातील दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना,
घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील दतिया येथील खालका पुरा भागात पावसामुळे
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका घराची भिंत कोसळल्याने
रात्री झोपेत असताना एकाच कुटुंबातील 9 जण ढिगाऱ्याखाली
गाडले गेले. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात
दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना ढिगाऱ्यातून कसेबसे
बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल
करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर
घटनास्थळी पोहोचलेले दतियाचे जिल्हाधिकारी संदीप माकिन
यांनी माहिती देताना सांगितले की, आज 12 सप्टेंबर रोजी पहाटे
सततच्या पावसामुळे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जण गाडले
गेले. स्थानिक लोकांनी कसेबसे 2 जणांना वाचवले. त्यांना रुग्णालयात
दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघातानंतर कुटुंबातील लोक वाचले त्यांना धक्का बसला आहे.
कारण त्यांच्या कुटुंबातील 9 जणांना जीव गमवावा लागला. मात्र,
दतियाचा खालका पुरा येथे ही दुःखद घटना घडली आहे. त्या भागात
राहणाऱ्या लोकांनाही धक्का बसला आहे.