आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी
भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत
राबविलेला ‘लिफाफा’ पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्या
Related News
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी,
याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने मंगळवारी संभाजीनगरमधील
पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद
लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागवून घेतली. यावेळी
पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद
पाकिटातून सोपविली.
उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे
बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गोवा आणि बिहारच्या
निवडणुकीत देखील भाजपकडून लिफाफा पॅटर्न राबवण्यात आला
होता. त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी
ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक
जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान
आमदारांना डच्चू दिला जाईल. तसे घडल्यास भाजप पक्षसंघटनेत
याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी
महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.
यावेळी एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होणार
आहेत. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय
घेतले होते. याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्याप्रमाणावर निर्णय
होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-5-october-rosie-maharashtra-dauriyavar/