देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी
२५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे.
ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी,
Related News
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा वादळ, शिंदे आणि अजितदादा कार्यक्रमातून वगळले
“माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून”
BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजना घाडी शिंदे गटात दाखल
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
अशी मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरूवारी केली.
राज्यसभेत शून्य प्रहरावेळी चड्ढा यांनी संबंधित मुद्दा उपस्थित केला.
देशातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे इतके आहे.
भारत जगातील सर्वांत तरूण देशांपैकी एक आहे,
याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा
कमी वयाचे आहेत. ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे.
देशात पहिल्या लोकसभेत निवडून गेलेले २९ टक्के सदस्य ४० वर्षांपेक्षा
कमी वयाचे होते. मात्र, मागील लोकसभेतील केवळ १२ टक्के खासदार
त्या वयोगटातील होते. आपला तरूण देश ज्येष्ठ राजकारणी असलेला आहे.
आपण तरूण राजकारण्यांचा तरूण देश बनण्याची आकांक्षा बाळगायला हवी.
आपल्या देशात राजकारणाला बॅड प्रोफेशन मानले जाते.
मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट बनावे असे पालकांना वाटते.
मुलांनी राजकारणी बनावे असे कुणालाच वाटत नाही.
राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.