सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद
त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर
आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे
Related News
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली
गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे
करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र
ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी
कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या
राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी
रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये पावसाने सर्व
विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी
शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि
भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी
मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि पिकांचे नुकसान झाले झाले.
सुमारे 15,000 रुपये प्रत्येकाला देण्याची मागणी केली होती.
त्रिपुरा प्रदेश काँग्रेसने सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत
पूरग्रस्तांना पुरेशी मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप
विरोधकांनी केला. यासाठीत्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
यामध्ये शेतकरी, मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि
पुरामुळे जीवन गमावलेल्या इतर कामगार वर्गाच्या लोकांना योग्य
नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलकांनी राज्य आणि
केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांच्या या तीव्र विरोधानंतर
त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्रिपुराचे
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली.
माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून
बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25
कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी
पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी
केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar/