सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे.
मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे
आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, अशी मागणी करत आहेत.
Related News
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा वादळ, शिंदे आणि अजितदादा कार्यक्रमातून वगळले
“माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून”
BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजना घाडी शिंदे गटात दाखल
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे.
त्यांना आमच्या प्रवर्गात सामावून घेऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.
असे असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर
आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत.
त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय.
कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं ते म्हणालेत.
“कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.
विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत.
त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे,” असे खळबळजनक विधान
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते.
“कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे,
त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत.
कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे,
असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत,
बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार
यांच्यासोबत तर अजिबातच नाही,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे.
हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल.
माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे.
ही जनगणना झाली पाहिजे,” अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/tension-flares-up-again-in-bangladesh/