राज्यातील हवामान कमालीचे बदलत असून, मागील दोन
दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. काही
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझीम पावसाच्या
सरी बरसताना दिसत आहे. हिच स्थिती पुढचे तीन दिवस कायम
राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या
अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य
प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रदीर्घ काळ विश्रांती
घेऊन पुन्हा सक्रीय झालेला हा परतीचा पाऊस तर नव्हे ना? असा
सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, परतीच्या पावसाबाबत
आयएमडीने अद्याप तरी भाष्य केले नाही. पर्जन्यमान यंदा
समाधानकारक म्हणावे असे आहे. राज्यातील बहुतांशी भागात
पावसाने हजेरी लावली आहे. अर्थात, त्यातही काही कमी अधिक
प्रमाण आहे. मात्र, असे असले तरी अगदीच नाही असेही चित्र
नाही. त्यामुळे बळीराजा आणि पशुपालन करणाऱ्या नागरिकांसाठी
ती एक सुखकारक बाब आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस राज्यात
पावसाचा सीलसीला कायम राहणार असल्याची शक्यता गृहीत
धरुन हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला
आहे.खास करुन रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी हा अलर्ट असून,
या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान अंदाज व्यक्त
करताना वर्तविण्यात आली आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी
रेड अलर्ट देण्यात आला आहे. नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई
उपनगरे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
वरील जिल्हे सोडून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
जारी करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/schools-closed-today-teachers-collective-raza-andolan-in-the-state/