महाराष्ट्रात GBS चा कहर सतत वाढतांना दिसत आहे. या आजाराची लागण झालेल्यांची
संख्या 200 च्या पार गेली आहे. त्यामुळे राज्यात एकच चिंतेचं वातावरण आहे.
आरोग्य विभागाच्या मते, एकूण रुग्णांपैकी 180 रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
राज्यातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अर्धवट शिजवलेले अन्न किंवा कोंबडीचे मांस खाऊ नये,
असे आवाहन केले आहे. पुण्यात कोंबड्यांच्या मांसामुळे जीबीएस
पसरल्याची चर्चा असताना जीबीएसचा धोका टाळण्यासाठी अन्न पूर्णपणे शिजवा,
असं आवाहन अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलंय.
तर अन्न पूर्ण शिजवल्याने जीबीएसचा धोका टाळण्यासाठी मदत होऊ शकते.
दुसरीकडे पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवेरे यांनी देखील अन्न पूर्ण शिजवून खाण्याचा सल्ला दिला आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम नेमका काय?
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील औषध विभागाच्या डॉक्टरांच्या मते,
हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत.
ज्यामध्ये सर्दी, खोकला आणि जास्त ताप येतो. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराची
रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/devachaya-dararatch-bhavikachi-loot-shirdi-saibabanya-darshanasathi-galya-ghadla-ghadla-blow-type/