मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली असून
अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्नाटक बॉर्डरजवळ
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
असलेल्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यांनाही या पावसाचा मोठा फटका
बसला असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
त्यामध्ये, लातूरमधील अनेक घरांचे व शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील नद्यांना पूरही आल्याचं पाहायला मिळालं.
मात्र, कर्नाटक पाटबंधाकेर विभागाची चूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
भोवल्याचं आता समोर आलं आहे. पावसाचा मोठा फटका येथील
शेतकऱ्यांना बसला असून प्रार्थमिक अंदाजानुसार साडेपाच हजार
हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता असून
औराद शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठ नुकसान झालं आहे.
मांजरा नदी लातूर जिल्ह्यात 145 किलोमीटर चा प्रवास करते.
जिल्ह्यात रेणा, तेरणा यांसारख्या नद्या मांजरा नदीला येऊन मिळतात.
औराद शहाजानीच्या बाजूला तेरणा नदी मांजरला मिळते, संगम जिथे होतो
तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असते.
मात्र, यावर्षी त्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मांजरा आणि तेरणाचा
संगम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमारेषेवर होत असतो.
त्या पार्श्वभूमीवर मांजरा नदीवर कर्नाटकात कोगळी येथे बॅरेजेस बांधण्यात
आले आहेत, कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून कर्नाटकात पूर परिस्थिती
निर्माण होऊ नये म्हणून बॅरेजचे दोनच दरवाजे उघडण्यात आले.
याचा थेट परिणाम मांजरा नदीच्या बॅक वॉटरच्या रूपाने झाला.
त्यामुळे, औराद शहाजानी शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन
पाण्याखाली गेली. कर्नाटक पाटबंधारे विभागाने केलेल्या या चुकीमुळे
मोठा फटका शेतातील मूग उडीद सोयाबीन यांसारख्या पिकांना बसला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rss-representative-in-every-assembly-planning-meeting-of-bjp/