सातारा जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचे
पर्यटन स्थळ आहे. कास पठारला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’
असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार
Related News
वसलेले आहे. या पठारावर 800 पेक्षा अधिक प्रकारची फुलांची झुडुपे आहेत.
साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही फुले उगवतात.
याच कारणामुळे याचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत
समावेश करण्यात आला आहे.
आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार आगामी
फुलांच्या हंगामासाठी सज्ज झाले आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांच्या अध्यक्षतेखाली आज साताऱ्यात यंदाच्या फुलांच्या हंगामाचे
अधिकृत उद्घाटन झाले आहे.
या वर्षी अपेक्षित असलेल्या पर्यटकांच्या ओघाला सामावून घेण्यासाठी
कास समितीने सहा नैसर्गिक झोपड्या, पार्किंग क्षेत्र, स्वच्छतागृहे, मोफत बससेवा,
पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांसह अनेक सुविधा उपलब्ध
करून दिल्या आहेत. मान्सूनचा पाऊस ओसरल्याने आता कास पठारावर विविध
प्रजातींची फुले बहरू लागली आहेत. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने
आधीच मोठ्या संख्येने इथे पर्यटक दाखल होत आहेत, अशात कास पठार
कार्यकारी समितीने उद्यापासून यंदाचा सिझन सुरु करण्याचा
निर्णय घेतला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/shaktipeeth-highway-projects-land-acquisition-process-canceled/
