किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
गोंडाळ यांच्या शेतातून सोनल प्रकल्पावर जाणारी विद्युत वाहिनी गेली आहे.
या वाहिनीतील एक जिवंत वायर तुटून जमिनीवर पडली, आणि त्याचवेळी जनावरे शेतात
चराईसाठी असताना या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तिन्ही जनावरे जागीच ठार झाली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेली जनावरे अशी – १ म्हैस, १ गाय आणि १ बैल, ज्यांचे एकूण अंदाजे
२ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,
अशी माहिती तलाठी एन. व्ही. अंबुलकर यांनी पंचनाम्यातून दिली आहे.
स्थानिकांकडून महावितरणवर संताप
या घटनेमुळे गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या
हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, विद्युत विभागाने वारंवार तक्रार करूनही
जुनी आणि खराब वायर बदलण्यात दिरंगाई केली, असा आरोप करण्यात येत आहे.
शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
वैजनाथ गोंडाळ यांचं शेती आणि दुग्धव्यवसायावर मोठं आर्थिक अवलंबित्व असून,
या घटनेने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vaishakh-pornemechaya-lakhkkat-katapurna-sanctuary-cross/