सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मालठाणा
येथील विद्यार्थिनी कु. रक्षा राजेंद्र सोळंके हिने जवाहर नवोदय विद्यालय,
अकोला प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
या आधीही या शाळेतील विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले असून, ही उज्ज्वल परंपरा रक्षा हिने पुढे चालू ठेवली आहे.
या यशामध्ये शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अरुण निमकर्डे सर व वर्गशिक्षक अमोल ढोकणे
सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांसाठी विशेष नवोदय वर्ग,
गणितीय शॉर्ट कट्स शिकवणे, प्रश्नसंच सोडवून घेणे,
तसेच शाळा सुटल्यानंतरही विशेष मार्गदर्शनाचे उपक्रम राबवले गेले.
रक्षाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील (राजेंद्र सोळंके व भाविका सोळंके), मुख्याध्यापक,
शिक्षक व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना दिले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती तेल्हारा गटशिक्षणाधिकारी दिनेशजी दुतंडे,
बेलखेड केंद्रप्रमुख यासीन सर, शाळा व्यवस्थापन समिती व मुख्य कार्यकारी
अधिकारी बी. वैष्णवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिरांचा मोठा फायदा झाल्याचेही सांगण्यात आले.
गावात व शाळेत या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून,
रक्षाच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.