गोदावरी नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ
मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये
पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
वाढ झाली आहे. जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा
विसर्ग करण्यात आला. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता 14 टक्क्यांवर
पोहचला आहे. काल झालेल्या पाण्याच्या विसर्गाआधी जायकवाडीचा पाणीसाठी 4 टक्क्यांपर्यंत घसरला होता.
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील
पाणीसाठा झपाट्याने वाढतोय.पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.
परिणामी नाशिकमध्ये पाऊस असचा सुरू राहिला तर, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात
आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पालखेड,
निळवंडे, गंगापूर, ओझरवेर, दारणा, भावली कडवा, नागमठाण, नांदूर मध्यमेश्वर,
भंडारदरा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये
सध्या पाण्याचे आवक वाढली आहे. सध्या जायकवाडी धरणात जवळपास
20 हजार क्युसेक्स आवक सुरू आहे. सध्याचा जायकवाडी धरणातील पाणीसाठा
पाहता पुढील 8 महिने पिण्यासाठी आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.
नाशिक शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे
काल रविवारी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.
परिणामी, गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
रविवारी दुपारी 12 वाजता धरणातून 500 क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
दुपारी 3 वाजता 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला.
पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात
येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.