जळगावाच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक
विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात
आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
मात्र या जेवणातून तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना
तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. सध्या
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार चिमणराव पाटील,
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील यांनी
विद्यार्थ्यांची भेट घेतली. जळगावातील सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती
विसर्जनानिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा
झाली आहे. या भंडाऱ्यात वरण-भात, गुलाब जामुन, भाजी असे जेवेण होते.
यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हे जेवण जेवले. हे जेवण जेवल्यानंतर
काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे
इत्यादी त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तामसवाडी येथून पारोळा या ठिकाणी
उपचारासाठी पाठवण्यात आले. साधारण 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या
विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर केलेल्या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना
अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-ministers-meeting-in-doda-today/