जळगावाच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक
विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात
आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मात्र या जेवणातून तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना
तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. सध्या
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार चिमणराव पाटील,
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील यांनी
विद्यार्थ्यांची भेट घेतली. जळगावातील सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती
विसर्जनानिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा
झाली आहे. या भंडाऱ्यात वरण-भात, गुलाब जामुन, भाजी असे जेवेण होते.
यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हे जेवण जेवले. हे जेवण जेवल्यानंतर
काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे
इत्यादी त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तामसवाडी येथून पारोळा या ठिकाणी
उपचारासाठी पाठवण्यात आले. साधारण 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या
विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर केलेल्या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना
अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-ministers-meeting-in-doda-today/