चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला
सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक
करण्यात आली होती. प्रमुख आरोपी असलेल्या जयदीप आपटेला 13
सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चेतन पाटील
याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची मुदत
संपल्यानतर पुन्हा जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही
न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यानंतर आता मोठी अपडेट समोर
आली आहे. सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे
याची आज पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांनी मालवण पोलिसांनी जयदीप
आपटेला मालवण न्यायालयासमोर हजर केले. तर दुसरीकडे या प्रकरणी सह
आरोपी असलेल्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील याने जामीनासाठी अर्ज केला
होता. या जामीन अर्जावर ओरोस येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.
त्यामुळे जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांचं काय होणार, याकडे सर्वांचेच
लक्ष लागले होतं. अखेर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना
प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे याला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन
कोठडी सुनावण्यात आली आहे. जयदीप आपटे हा गेल्या आठ दिवसांपासून
मालवण पोलीस कोठडीत आहे. त्यानंतर आज त्याला मालवणच्या दिवाणी
न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला. तर दुसरीकडे
सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन
पाटीलचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे त्याला येत्या १९ सप्टेंबरपर्यंत
जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी
यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चेतन पाटीलच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
करण्याची मागणी केली होती. तर चेतनने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
नुकत्याच झालेल्या सुनावणीत चेतन पाटीलचा जेलमधील मुक्काम अजून सहा दिवसांनी
वाढला आहे. त्यामुळे त्या 19 सप्टेंबरपर्यंत जेलमध्येच राहावं लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil/