इरफानला करायचा होता महादेवाचा उपवास पणa नावामागे खान लावणंही केलेलं बंद

इरफानला

 

मुंबई– बॉलिवूडमधला एक उत्कृष्ठ तारा २९ एप्रिल २०२० रोजी जगाने कायमचा गमावला. याच दिवशी अभिनेता इरफान खान इरफान खानचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.

मात्र त्यांच्या आठवणी व त्यांनी साकारलेल्या कलाकृती आजही त्यांच्या कुटुंबाच्या व प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

Related News

इरफानने आपल्या अभिनयाने, साधेपणाने आणि वागण्याने लोकांमध्ये एक अमिट छाप सोडली आहे, जी कधीही पुसली जाणार नाही.

त्यांनी शंकराच्या वाराला म्हणजेच सोमवारी उपवास करण्याचे ठरवले होते.

याशिवाय ते अध्यात्माला पूर्णपणे वाहून घेण्याचा विचार करत होते. तसेच, त्यांनी आपल्या नावातले खान हे आडनावही काढून टाकले होते.

इरफान खानने २३ फेब्रुवारी १९९५ रोजी सुतापा सिकंदरशी लग्न केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD मध्ये एका नाटकादरम्यान दोघांची भेट झाली.

ते प्रेमात पडले आणि नंतर कोर्टात लग्न केले. मात्र, प्रेम आणि लग्नादरम्यान दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचदरम्यान त्या गरोदरही राहिल्या.

घर शोधत असताना, जेव्हा त्याला विचारले गेले की त्याचे लग्न झाले आहे, तेव्हा अभिनेत्याने सुतापाला कायदेशीररित्या पत्नी बनवले. अभिनेता सुतापासाठी धर्म बदलण्यासही तयार होता.

इरफानची पत्नी सुतापा रोजे ठेवते

सुतापाने एका मुलाखतीत इरफानबद्दल सांगताना म्हटलेले की, ती मुस्लिम नाही, पण रोजा ठेवते.

अभिनेत्याने तिला शिकवले होते की मुस्लिम होण्यासाठी रोजा ठेवण्याची किंवा अल्लाहची पूजा करण्यासाठी धर्मपरिवर्तनाची गरज नाही.

सुतापाने सांगितले होते की, अभिनेत्याला सोमवारचा उपवास धरायचा होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

इरफानला सोमवारी उपवास करायचे होते

सुतापाने सांगितले होते, ‘इरफान उपवास नाही करु शकले. त्यांना दोन वर्षांपासू उपवास करण्याची इच्छा होती.

आठवड्यातून एकदा उपवास करणार असे तो म्हणयचा. आपण शंकराचे व्रत करणार असल्याचे सांगून त्याने नातेवाईकांना आश्चर्यचकित केले.

इरफानने त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते की, ‘मी ठरवले आहे की मी सोमवारी म्हणजेच महादेवाच्या दिवशी उपवास करेन.’

इरफानने शेवटच्या क्षणी हे वाचले

इरफान जिवंत असता तर त्याने स्वतःचा धर्म निर्माण केला असता, त्याच्यासाठी धर्म म्हणजे अध्यात्म होते.

‘त्याच्या नशिबात लिहिलं होतं की तो हे शोबिझ सोडून स्वतःच्या शोधात जाईल. त्याने वाचायला सुरुवात केली होती.

त्यांनी उपनिषदे वाचली, रामकृष्ण परमहंस वाचले, विवेकानंद वाचले. ओशो, महावीर सगळे वाचले. पण तो कधीच धार्मिक नव्हता. तो आत्मशोधाच्या प्रवासात होता.

 

 

Related News