इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल्याने अंदाजे २०० एकरांहून अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या आधारावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
मात्र नंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे काही शेतांतील बियाणे वाहून गेले, काही सडले, तर काही जमिनीखाली दबले.
परिणामी बियाण्याचा उगमच झाला नाही.
बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
बियाण्याची मागणी अचानक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काहींनी बियाणे मिळवून दुबार पेरणीस सुरुवात देखील केली आहे.
कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही
दुबार पेरणीची परिस्थिती गंभीर असतानाही कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
त्यामुळे ही माहिती अद्याप प्रशासनाच्या नोंदीत नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे
“माझ्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, पण २६ आणि २७ जुन रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही.
त्यामुळे पुन्हा बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी करत आहे. प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करणे आवश्यक आहे.”
— रवी काळेकर, शेतकरी, इंझोरी
“यंदा पावसाला विलंब झाला. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून अल्पशा पावसावरच पेरणी केली.
मात्र नंतर आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बियाणे उगवलेच नाही. आता दुबार पेरणी करावी लागत आहे.
याची तक्रार लवकरच कृषी विभागाकडे करणार आहे.”
— अशोक इंगोले, शेतकरी, इंझोरी
तत्काळ पाहणी आणि मदतीची गरज
स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की,
लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.
अन्यथा शेतकरी अधिक अडचणीत सापडतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/every-person-in-your-name-shindencha-sher-aani-jai-gujarat-azhane-churchna-udhan/