इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल्याने अंदाजे २०० एकरांहून अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या आधारावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
मात्र नंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे काही शेतांतील बियाणे वाहून गेले, काही सडले, तर काही जमिनीखाली दबले.
परिणामी बियाण्याचा उगमच झाला नाही.
बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
बियाण्याची मागणी अचानक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काहींनी बियाणे मिळवून दुबार पेरणीस सुरुवात देखील केली आहे.
कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही
दुबार पेरणीची परिस्थिती गंभीर असतानाही कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
त्यामुळे ही माहिती अद्याप प्रशासनाच्या नोंदीत नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे
“माझ्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, पण २६ आणि २७ जुन रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही.
त्यामुळे पुन्हा बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी करत आहे. प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करणे आवश्यक आहे.”
— रवी काळेकर, शेतकरी, इंझोरी
“यंदा पावसाला विलंब झाला. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून अल्पशा पावसावरच पेरणी केली.
मात्र नंतर आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बियाणे उगवलेच नाही. आता दुबार पेरणी करावी लागत आहे.
याची तक्रार लवकरच कृषी विभागाकडे करणार आहे.”
— अशोक इंगोले, शेतकरी, इंझोरी
तत्काळ पाहणी आणि मदतीची गरज
स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की,
लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.
अन्यथा शेतकरी अधिक अडचणीत सापडतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/every-person-in-your-name-shindencha-sher-aani-jai-gujarat-azhane-churchna-udhan/