नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.
40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून
काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा
मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही.
तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, यूपी एफटी
7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात
14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत.
खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून
झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस
यांनी म्हटले. तसेच, जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार
असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते.
Read also: https://ajinkyabharat.com/today-is-the-first-national-interval-day/