नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.
40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून
काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा
मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही.
तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, यूपी एफटी
7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात
14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत.
खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून
झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस
यांनी म्हटले. तसेच, जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार
असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते.
Read also: https://ajinkyabharat.com/today-is-the-first-national-interval-day/