मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन संच—E5 आणि E3 सिरीज—मोफत देण्यात येणार आहेत.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हे दोन्ही संच २०२६ च्या सुरुवातीस भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
या बुलेट ट्रेन संचांमध्ये विशेष निरीक्षण उपकरणे बसवण्यात आली असून,
भारतातल्या उष्ण हवामान, धूळ व भूप्रदेशातील विविध
अडचणींमध्ये बुलेट ट्रेनची कामगिरी कशी राहते, याचे महत्त्वाचे डेटा संकलित करण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरु असलेल्या उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी हे ट्रेन संच वापरण्यात येणार आहेत.
ही पुढाकार भारत-जपान मैत्रीतील आणखी एक मजबूत पाऊल असून,
भारतीय अभियंत्यांना शिंकान्सेन तंत्रज्ञान समजून घेता यावे आणि देशांतर्गत
हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान विकसित करण्यास गती मिळावी, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.
ई१० सिरीज प्रवासी सेवेसाठी
सध्या मोफत देण्यात येणारे E5 आणि E3 सिरीजचे संच केवळ चाचणीसाठी वापरण्यात येणार असून,
प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी जपानच्या पुढील पिढीतील E10 सिरीज ट्रेनची निवड करण्यात आली आहे.
ही प्रवासी सेवा २०३० च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत-जपानमधील या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे देशातील हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून,
यामुळे भारतातील रेल्वे वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akol-ninth-central-government-congress/