मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन संच—E5 आणि E3 सिरीज—मोफत देण्यात येणार आहेत.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
हे दोन्ही संच २०२६ च्या सुरुवातीस भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
या बुलेट ट्रेन संचांमध्ये विशेष निरीक्षण उपकरणे बसवण्यात आली असून,
भारतातल्या उष्ण हवामान, धूळ व भूप्रदेशातील विविध
अडचणींमध्ये बुलेट ट्रेनची कामगिरी कशी राहते, याचे महत्त्वाचे डेटा संकलित करण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरु असलेल्या उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी हे ट्रेन संच वापरण्यात येणार आहेत.
ही पुढाकार भारत-जपान मैत्रीतील आणखी एक मजबूत पाऊल असून,
भारतीय अभियंत्यांना शिंकान्सेन तंत्रज्ञान समजून घेता यावे आणि देशांतर्गत
हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान विकसित करण्यास गती मिळावी, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.
ई१० सिरीज प्रवासी सेवेसाठी
सध्या मोफत देण्यात येणारे E5 आणि E3 सिरीजचे संच केवळ चाचणीसाठी वापरण्यात येणार असून,
प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी जपानच्या पुढील पिढीतील E10 सिरीज ट्रेनची निवड करण्यात आली आहे.
ही प्रवासी सेवा २०३० च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत-जपानमधील या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे देशातील हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून,
यामुळे भारतातील रेल्वे वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akol-ninth-central-government-congress/