एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना
देशभरात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुका या देशाच्या प्रगतीत
अडथळा बनत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासात अडचणी येत आहेत.
Related News
हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
...
Continue reading
अकोला | १३ एप्रिल २०२५
गांधी नगर सिंधी कॅम्प येथील श्री इच्छेश्वरी माता मंदिर चौक येथे श्री इच्छेश्वर मित्र परिवार
मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम...
Continue reading
राखोंडे परिवारा कडुन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भीम सैनिकांना थंड पाण्याचे वितरण व आयोजन
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातूर व स्वामी विवेकानंद युवती बहु.
...
Continue reading
दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) टर्मिनल-2 (T2)
सोमवारपासून तात्पुरत्या स्वरूपात देखभाल व सुधारणा कामांमुळे बंद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे इं...
Continue reading
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी आजपासून (15 एप्रिल) नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
यावर्षी यात्रेचा कालावधी 3 जुलै ते 9 ऑगस्ट (रक्षाबंधन) असा 39 दिवसांचा असून,
सुमारे 6 ल...
Continue reading
तक्रार केल्यावर पोलिसांनी पीडितेलाच फटकारलं, व्हिडिओ व्हायरल
अलिगढ (उत्तर प्रदेश) – देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या
उत्साहात साजरी केली जात असताना, उत्तर प्रदेशमधी...
Continue reading
फाळेगाव येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना.
मंगरूळपीर : आपल्या समाजातील कार्यक्षम भगिनी व बांधवांनी उद्योग क्षेत्रामध्ये आले पाहिजे,
आम्ही डिक्की या दलित उद्योजक संघटनेमा...
Continue reading
अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन या खासगी
अंतराळ संस्थेने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ब्लू ओरिजिनच्या मिशन NS-31 अंतर्गत,
जेफ बेझोस यांची मंगेतर लॉरेन सांच...
Continue reading
वाराणसी |
लखनऊ: वाराणसीमध्ये १९ वर्षीय युवतीवर सात दिवसांत २३ जणांनी सामूहिक
बलात्कार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर शासनाने मोठी कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोद...
Continue reading
खामगाव |
15 एप्रिल: खामगाव-नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ आज सकाळी
साडे सात वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे.
मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बस आणि विटांची वाहतूक ...
Continue reading
अकोला |
14 एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त
सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे शहरात सायंकाळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीची सुरुवात अ...
Continue reading
अकोला |
14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुन्या बसस्थानकावर साकारण्यात
आलेल्या भव्य रांगोळीवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांम...
Continue reading
त्यामुळे आता संपूर्ण देशाने ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण
अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण
वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी गुरुवारी देशाच्या 78 व्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाबाबत केलेले वक्तव्य
आगामी काळाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
तब्बल 97 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी
विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मात्र, त्यांच्या भाषणातील सेक्युलर सिव्हिल कोड
आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन मुद्दे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले.
पंतप्रधान मोदी यांनी देशात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांबाबत
भाष्य करताना म्हटले की, देशात कोणतीही योजना राबवायला गेले की त्याचा संबंध
निवडणुकीशी जोडला जातो. निवडणूक आली म्हणून योजना आली, असे बोलले जाते.
एकूणच सगळ्या गोष्टींचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो.
यादृष्टीने One Nation One Election या धोरणाबाबत व्यापक चर्चा झाली आहे.
राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. एका समितीने
याबाबत चांगला अहवाल मांडला आहे. आता संपूर्ण देशाने वन नेशन,
वन इलेक्शनसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे.
भारतातील स्रोतांचा वापर जास्तीत जास्त सामान्य लोकांसाठी करता यावं,
त्याचा अपव्यय कमी व्हावा यासाठी देशात वन नेशन, वन इलेक्शन धोरणाची गरज आहे,
असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला.
देशातील घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीचे नुकसान करत आहे.
यापासून देशाला मुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी एक मिशन हाती घेतले जाणार आहे.
या मिशनअंतर्गत देशातील राजकारणात 1 लाख तरुणांना पुढे आणले जाईल.
या तरुणांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल, त्यांचे वडील, काका किंवा
मामा कोणीही राजकारणात नसेल. हे तरुण जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा
किंवा लोकसभा कुठेही काम करतील. या तरुणांनी कोणत्या पक्षात यावे,
याची सक्ती नाही. ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. मात्र, यामुळे देशाला घराणेशाही
आणि जातीयवादापासून मुक्ती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/maldives-took-a-special-big-decision-for-india/