मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची
बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात
वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास
आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन
डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र
सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत
अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत
शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या
हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या
हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या
शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा
राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.
1. गहू – 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल
हमीभाव असणार
2. मोहरीच्या किंमतीत – 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950
रूपये क्विंटल हमीभाव असणार
3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980
रूपये क्विंटल हमीभाव असणार
4. हरभऱ्याची किंमतीत – 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार
650 रूपये क्विंटल हमीभाव असणार
5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार
700 रूपये क्विंटल हमीभाव असणार
6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार
940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.