मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 पिकांसाठी मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची
बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात
वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत
पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास
आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै 2024 वरुन
डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र
सरकारच्या या योजनेमुळं 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत
अन्नधान्य मिळणार आहे. त्यानंतर, आज झालेल्या बैठकीत
शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने 6 पिकांच्या
हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामध्ये, गव्हाच्या
हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार
आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणाऱ्या
शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, सरकारच्या या निर्णयाचा
राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा लाभ होईल.
1. गहू – 150 रुपयाची वाढ आता 2 हजार 475 रूपये क्विंटल
हमीभाव असणार
2. मोहरीच्या किंमतीत – 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950
रूपये क्विंटल हमीभाव असणार
3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ आता 1 हजार 980
रूपये क्विंटल हमीभाव असणार
4. हरभऱ्याची किंमतीत – 210 रुपयाची वाढ होऊन 5 हजार
650 रूपये क्विंटल हमीभाव असणार
5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ होऊन आता 6 हजार
700 रूपये क्विंटल हमीभाव असणार
6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ होऊन आता 5 हजार
940 रूपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/knowing-mahadev-the-great-alliance-will-fight-outside-with-its-own-strength/