डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुनियाचे 164 रुग्ण
लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ
मुंबईत पावसाळा सुरु झाला की, साथीचे आजार डोकं वर काढतात.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
ऑगस्टमध्ये मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यीच
माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत
जून आणि जुलैमध्ये पाऊस जोरदार होता. तरी साथीच्या आजारांमध्ये
वाढ झाली नव्हती. मात्र, ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया
रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चिकनगुनियाचे 164 रुग्ण आढळले आहेत.
स्वाईन फ्लू व कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात
ऑगस्टपर्यंत डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईप्रमाणे राज्यातही चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये
ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकनगुनियाचे 164
रुग्ण सापडले असून, राज्यामध्ये 1123 इतके रुग्ण सापडले आहेत.
मुंबईत हिवतापाचे 1171 रुग्ण, डेंग्यूचे 1013 रुग्ण, लेप्टोचे 272 रुग्ण, कावीळ 169
आणि स्वाईन फ्लूचे 170 रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये स्वाईन फ्लूने अचानक
डोके वर काढले. जुलैमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी
साचण्याच्या घटना वाढल्या. परिणामी साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास
करावा लागला. त्यामुळे त्या काळात लेप्टोचे रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे हिवताप,
डेंग्यूपाठोपाठ स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र ऑगस्टमध्ये अधूनमधून
होत असलेला पाऊस व वाढते ऊन यामुळे हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांबरोबरच
चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/suspected-cookie-atirekyakaduna-drone-bombcha-vapor-in-manipur/