डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुनियाचे 164 रुग्ण
लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ
मुंबईत पावसाळा सुरु झाला की, साथीचे आजार डोकं वर काढतात.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
ऑगस्टमध्ये मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यीच
माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत
जून आणि जुलैमध्ये पाऊस जोरदार होता. तरी साथीच्या आजारांमध्ये
वाढ झाली नव्हती. मात्र, ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया
रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चिकनगुनियाचे 164 रुग्ण आढळले आहेत.
स्वाईन फ्लू व कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात
ऑगस्टपर्यंत डेंग्यूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईप्रमाणे राज्यातही चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये
ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकनगुनियाचे 164
रुग्ण सापडले असून, राज्यामध्ये 1123 इतके रुग्ण सापडले आहेत.
मुंबईत हिवतापाचे 1171 रुग्ण, डेंग्यूचे 1013 रुग्ण, लेप्टोचे 272 रुग्ण, कावीळ 169
आणि स्वाईन फ्लूचे 170 रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये स्वाईन फ्लूने अचानक
डोके वर काढले. जुलैमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी
साचण्याच्या घटना वाढल्या. परिणामी साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास
करावा लागला. त्यामुळे त्या काळात लेप्टोचे रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामुळे हिवताप,
डेंग्यूपाठोपाठ स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र ऑगस्टमध्ये अधूनमधून
होत असलेला पाऊस व वाढते ऊन यामुळे हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांबरोबरच
चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/suspected-cookie-atirekyakaduna-drone-bombcha-vapor-in-manipur/