पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर काही
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
दिवसांतच सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू
होईल, असेही ते म्हणाले. सोलापूर-मुंबई सेवा सुरू करण्यापूर्वी
पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी विमान
वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. ही सेवा कंपनी ‘Fly91’ द्वारे
प्रदान केली जाईल आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF)
योजनेअंतर्गत सुरू होईल. विमान कंपनीचे आर्थिक नुकसान
झाल्यास राज्य सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवालानुसार, भारताच्या विमान
उद्योगातील सर्वात नवीन जोड असलेले FLY91 हे एक प्रादेशिक
वाहक आहे. ही विमान कंपनी भारतातील टियर 2 आणि टियर 3
शहरांमधून हवाई कनेक्टिव्हिटी वाढवू इच्छित आहे. आता ही
कंपनी पुणे-सोलापूर विमान सेवा सुरु करेल. यामध्ये प्रवाशांना
तिकिटावर सबसिडीही दिली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर सोलापूर-
मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूर-मुंबई
उड्डाणाला उशीर झाल्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने
पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात केंद्रीय नागरी विमान
वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर विमानतळाच्या
प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सोशल मिडियावर सांगितले की,
सोलापूर विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि या
प्रकल्पासंदर्भात नवी दिल्ली येथे आढावा बैठक आयोजित
करण्यात आली होती. बैठकीत विमानतळाच्या बांधकामाच्या
अंतिम टप्प्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी
कामाची स्थिती आणि तांत्रिक बाबींचाही आढावा घेण्यात आला,
असेही ते म्हणाले.