पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर काही
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
दिवसांतच सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू
होईल, असेही ते म्हणाले. सोलापूर-मुंबई सेवा सुरू करण्यापूर्वी
पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी विमान
वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. ही सेवा कंपनी ‘Fly91’ द्वारे
प्रदान केली जाईल आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF)
योजनेअंतर्गत सुरू होईल. विमान कंपनीचे आर्थिक नुकसान
झाल्यास राज्य सरकार त्यांना नुकसान भरपाई देईल, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवालानुसार, भारताच्या विमान
उद्योगातील सर्वात नवीन जोड असलेले FLY91 हे एक प्रादेशिक
वाहक आहे. ही विमान कंपनी भारतातील टियर 2 आणि टियर 3
शहरांमधून हवाई कनेक्टिव्हिटी वाढवू इच्छित आहे. आता ही
कंपनी पुणे-सोलापूर विमान सेवा सुरु करेल. यामध्ये प्रवाशांना
तिकिटावर सबसिडीही दिली जाणार आहे. नोव्हेंबरअखेर सोलापूर-
मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूर-मुंबई
उड्डाणाला उशीर झाल्यामुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने
पुणे-सोलापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात केंद्रीय नागरी विमान
वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर विमानतळाच्या
प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सोशल मिडियावर सांगितले की,
सोलापूर विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि या
प्रकल्पासंदर्भात नवी दिल्ली येथे आढावा बैठक आयोजित
करण्यात आली होती. बैठकीत विमानतळाच्या बांधकामाच्या
अंतिम टप्प्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी
कामाची स्थिती आणि तांत्रिक बाबींचाही आढावा घेण्यात आला,
असेही ते म्हणाले.