गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
मात्र, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी
काही मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’
या निवासस्थानासमोर आंदोलन केलं.
यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
तसेच यावेळी त्यांनी सूचक विधानही केलं.
दोन तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार, असं मनोज जरांगे यांनी
माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच.
फक्त सत्ताधारी पक्षाला नाही तर विरोधकांना देखील आम्ही सांगतो.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा.
सत्ताधारी आणि विरोधकांनी ७० वर्ष आमचे मते घेतलेले आहेत.
त्यामुळे भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जर हे भूमिका स्पष्ट करत नसतील
तर यावेळी मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काही आंदोलकांनी आंदोलन केलं.
यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आता आम्ही टेन्शन घेत नाहीत.
कारण लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण १२ ते १३ संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या
सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूने न बोलता फक्त काहीही बोलायचं असं त्यांनी सांगितलं.
Read also: https://ajinkyabharat.com/raju-shetty-will-field-288-candidates-for-assembly/