महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज
काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी
काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा
करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला,
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,
पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत.
हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा
घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत
चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी
यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी
नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल
झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात
देखील दाखल झाले आहेत. आज विधानसभा निवडणूक जाहीर
होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील
काही जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या
बैठकीत यावर चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार
रणनितीबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-toll-waiver-announcement-by-shinde-government/