राजू शेट्टींची सरकारवर टीका – “महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली”
मूर्तिजापूर (जि. अकोला): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी साहित्य
संमेलन आणि दहावे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
Related News
तामिळनाडूची प्रसिद्ध मसाला बेबी बटाटा रेसिपी; कुरकुरीत, मसालेदार आणि प्रत्येक जेवणाची चव वाढवणारा भन्नाट साईड डिश
तामिळनाडूची प्रसिद्ध मसाला बेबी बटाटा रेसिपी; एकदा खाल तर वारंवार...
Continue reading
'रामायण'च्या प्रचार सोहळ्यात साई पल्लवीचा दिव्य लूक; सीतेच्या भूमिकेबाबत व्यक्त केल्या मनातील भावना
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित '
Continue reading
दिल्लीत 'रामायण'चा भव्य जल्लोष! रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, करण जोहर यांची दमदार उपस्थिती; 24 जुलैला ट्रेलर, दिवाळी 2026 ला पहिला भाग
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ...
Continue reading
"मला माझ्या वडिलांचा तिरस्कार वाटतो, कारण ते पुरुष आहेत..." ‘ Indias Got Talent 2 ’मधील साक्षी झाच्या विधानाने खळबळ
लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘
Continue reading
पुणे मेट्रो ३च्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके पूर्ण झाली आहेत. तरीही मेट्रो सेवा सुरू झालेली नाही. उद्घाटन का रखडल...
Continue reading
जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे विलियम इश्माइल? बिझनेस क्षेत्रातील मोठं नाव चर्चेत
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
भारतासह जगभरात Facebook ठप्प! यूजर्सच्या अकाऊंटवर दिसतोय ‘Account Temporarily Unavailable’ मेसेज; मेटाकडून अद्याप स्पष्टीकरण नाही
सोशल मीडिया वापरणाऱ्या कोट्यवधी यूजर्ससाठी मोठी ब...
Continue reading
मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत? विलिनीकरणाच्या चर्चांना संजय शिरसाटांचा ब्रेक; म्हणाले, “अटी-शर्थी मान्य नाहीत”
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपा...
Continue reading
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण आहे? तिची भूमिका, सोशल मीडिया पोस्ट, पुरुष हक्क चळवळ, उन्नाव प्रकरणावरी...
Continue reading
EPFO ची मोठी तयारी! फ्रीलांसर, गिग वर्कर्स आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी येणार ‘युनिव्हर्सल PF’ योजना
देशातील कोट्यवधी फ्रीलांसर, गिग वर्कर्स आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांसाठी...
Continue reading
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! ‘भारतगॅस लाईट झिप’ सेवेची सुरुवात; हलके सिलिंडर, झटपट कनेक्शन आणि फास्ट डिलिव्हरीचा लाभ...
Continue reading
या दोन दिवसीय कार्यक्रमात शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल मंथन होणार आहे.
या संमेलनाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की, महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
“महायुतीचे नेते ग्रामीण भागात फिरू शकणार नाहीत” – शेट्टी
राजू शेट्टी यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार गेली अनेक वर्षे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची पुरेशी माहिती आहे.
तरीही त्यांनी असे आश्वासन का दिले?” त्यांनी महायुतीवर टीका करत म्हटले की,
“शेतकऱ्यांना गंडवून फक्त मतं मिळवण्याचा हा डाव आहे.
त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही ग्रामीण भागात फिरू देणार नाही.”
अजित पवारांवर ‘मोहम्मद तुघलक’ची उपमा
शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना “मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला,
हा इतिहास त्यांनी बघावा” असे म्हणत टीका केली.
तसेच, राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, मात्र काही अंशी शेतकरी स्वतःही
सरकारच्या धोरणांना जबाबदार आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.