राजू शेट्टींची सरकारवर टीका – “महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली”
मूर्तिजापूर (जि. अकोला): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी साहित्य
संमेलन आणि दहावे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
Related News
इंदोर मध्ये एमबीए विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून खून; आरोपीचा शांतपणे दिला गंभीर वक्तव्य
मध्य प्रदेशच्या इंदोर शहरात एका २४ वर्षीय MBA विद्यार्थिनीचा...
Continue reading
हार्दिक पंड्याचा समुद्रकिनाऱ्यावरून ‘राजकन्या’ महिका शर्माला जन्मदिनाची खास शुभेच्छा
भारतीय क्रिकेटपटू Hardik Pandya ने आपल्या गर्लफ्रेंड महिका ...
Continue reading
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवल्यामुळे काय होऊ शकते? जाणून घ्या पूजा-संस्कारातील योग्य मार्ग
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
शेअर बाजार अपडेट: सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजा...
Continue reading
GI-टॅग केलेल्या भारतीय कॉफीला AI Impact Summit 2026 मध्ये जागतिक मान्यता – भारताने कॉफीच्या सुगंधातून जगाला आमंत्रण दिले
भारताच्या वापरातील पारंपरिक आणि खास भौगोलिक गुणांनी समृद्ध...
Continue reading
“Yeh Rishta Kya Kehlata Hai ”मधील नवीन ट्विस्ट — अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्यातील नवे संकेत आणि उत्कंठावर्धक ड्रामा!
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्य...
Continue reading
द्वारका अपघात: वाहने दुचाकीस्वाराचा जीव घेतल्यानंतर मुलगा व त्याची बहीण चुकीचा आरोप करीत विश्रांती स्थानकात पसार
दिल्लीतल्या द्वारका भागात एका...
Continue reading
“The 50” चा धक्कादायक एपिसोड : निक्की तंबोलीची भावना, वर्चस्वाची लढाई आणि वाइल्डकार्ड रिटर्न
रियालिटी शो “The 50” मध्ये प्रत्येक एपिसोडकडे प्रेक्षक मोठ...
Continue reading
या दोन दिवसीय कार्यक्रमात शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल मंथन होणार आहे.
या संमेलनाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की, महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
“महायुतीचे नेते ग्रामीण भागात फिरू शकणार नाहीत” – शेट्टी
राजू शेट्टी यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार गेली अनेक वर्षे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची पुरेशी माहिती आहे.
तरीही त्यांनी असे आश्वासन का दिले?” त्यांनी महायुतीवर टीका करत म्हटले की,
“शेतकऱ्यांना गंडवून फक्त मतं मिळवण्याचा हा डाव आहे.
त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही ग्रामीण भागात फिरू देणार नाही.”
अजित पवारांवर ‘मोहम्मद तुघलक’ची उपमा
शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना “मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला,
हा इतिहास त्यांनी बघावा” असे म्हणत टीका केली.
तसेच, राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, मात्र काही अंशी शेतकरी स्वतःही
सरकारच्या धोरणांना जबाबदार आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.