राजू शेट्टींची सरकारवर टीका – “महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली”
मूर्तिजापूर (जि. अकोला): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे चौथे शेतकरी साहित्य
संमेलन आणि दहावे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
Related News
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
या दोन दिवसीय कार्यक्रमात शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल मंथन होणार आहे.
या संमेलनाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हजेरी लावली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी आरोप केला की, महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
“महायुतीचे नेते ग्रामीण भागात फिरू शकणार नाहीत” – शेट्टी
राजू शेट्टी यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार गेली अनेक वर्षे अर्थमंत्री होते, त्यांना अर्थव्यवस्थेची पुरेशी माहिती आहे.
तरीही त्यांनी असे आश्वासन का दिले?” त्यांनी महायुतीवर टीका करत म्हटले की,
“शेतकऱ्यांना गंडवून फक्त मतं मिळवण्याचा हा डाव आहे.
त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही ग्रामीण भागात फिरू देणार नाही.”
अजित पवारांवर ‘मोहम्मद तुघलक’ची उपमा
शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना “मोहम्मद तुघलकाचा शेवट कसा झाला,
हा इतिहास त्यांनी बघावा” असे म्हणत टीका केली.
तसेच, राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
“सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही, मात्र काही अंशी शेतकरी स्वतःही
सरकारच्या धोरणांना जबाबदार आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.