उष्माघात की अन्न विषबाधा; फरक कसा ओळखावा ?

सध्या

सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरीसुद्धा अधूनमधून तापमानाचा पारा वाढल्याचे दिसून येते.

खरंतर भर उन्हात घराबाहेर पडताना आपण खूप काळजी घेतो;

Related News

पण तुम्हाला माहीत आहे का, अतिउष्णतेमुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो.

डिहायड्रेशन, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलित होणे

आणि आहारात होणारे बदल यांमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते;

ज्यामुळे उष्माघातच नाही, तर अन्नामधून विषबाधाही होऊ शकते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक कसा ओळखायचा?

दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक ओळखण्यासाठी

वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे,

असे दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनचे संचालक डॉ. राजीव गुप्ता सांगतात.

उष्माघाताच्या लक्षणांमध्ये शरीराचे तापमान वाढते,

मानसिक स्थिती बदलते, त्वचा कोरडी पडते;

ज्यामुळे घाम येत नाही.

हृदयाचे ठोके वाढतात आणि काही प्रकरणांमध्ये व्यक्ती बेशुद्धसुद्धा पडू शकतो.

अन्न विषबाधेमध्ये व्यक्तीला मळमळ वाटणे, उलटी होणे,

अतिसार, ओटीपोटात दुखणे किंवा कचित प्रकरणांत ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

जास्तीत जास्त द्रवपदार्थ प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.

लहान मुले, बृद्ध लोक, हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती,

श्वासाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती,

यकृताचे आजार असलेल्या व्यक्ती इत्यादी लोकांना

उष्णतेमुळे होणारे आजारांचा धोका जास्त असतो.

या लोकांमध्ये उष्णतेचा साम ना करण्याची क्षमता कमी असते;

ज्यामुळे त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो,

असे डॉ. गुप्ता सांगतात जेव्हा कमी ऊन असेल तेव्हाच घराबाहेर पडा.

हलक्या कपड्यांचा वापर करा.

घरातून बाहेर पडण्यम्पूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा.

आजारी आणि गोकांची नियमित तपासणी करा.

त्यांच्या शरिरात पाण्याची कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्या.

Read also: https://ajinkyabharat.com/dear-sister-of-madhya-pradesh-maharashtra/

Related News