जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम
टप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत २८.१२ टक्के मतदान
झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात कडेकोट
बंदोबस्तात जम्मू- काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील ४० विधानसभा
जागांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान
केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. केंद्रशासित प्रदेशातील
३९.१८ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचे भवितव्य
ठरवतील. या उमेदवारांमध्ये तारा चंद आणि मुझफ्फर बेग या दोन
माजी उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील
बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या तीन सीमावर्ती
जिल्ह्यांमध्येही मतदान सुरू आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात
मतदान होत आहे त्यामध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील बारामुल्ला,
उरी, रफियााबाद, पट्टण, गुलमर्ग, सोपोर आणि वापोरा-क्रेरी,
कुपवाडा जिल्ह्यातील कुपवाडा, कर्नाह, त्रेहगाम, हंदवाडा, लोलाब
आणि लंगट आणि बांदीपोरा जिल्ह्यातील बांदीपोरा, सोनवारी
आणि गुरेझ यांचा समावेश आहे. या १६ विधानसभा जागांसाठी
२०२ उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू प्रदेशातील उपमपूर, सांबा
आणि कठुआ जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघातही मतदान
होत आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, जम्मू-काश्मीर
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २८.१२
टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,
कठुआ जिल्ह्यातील बानी मतदारसंघात पहिल्या चार तासांत
३४.९२ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या
आकडेवारीनुसार, एकेकाळी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा
बालेकिल्ला असलेल्या सोपोरमध्ये सर्वात कमी १७.२८ टक्के
मतदान झाले. मतदानादरम्यान सुरक्षित वातावरण सुनिश्चित
करण्यासाठी निमलष्करी आणि सशस्त्र पोलिस दलांसह सुरक्षा
दलांच्या ४०० हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-support-base-is-devendra-fadnavis/