बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा
तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा
देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठवाड्यात मागील आठवड्यात रिमझिम हलका पाऊस झाल्याने
धरण साठ्यात फार वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून
मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू झालाय. पुढील पाच दिवस
मराठवाड्यात सर्वदूर पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आलाय.
पुढील दोन दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस
होणार असून त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असेल व त्यानंतर
पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक
हवामान केंद्राने वर्तवले. मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून
जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ओढे नाले ओसंडून वाहत असून धरण साठ्यातही वाढ होत आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑगस्ट
रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड व परभणी जिल्हयात
तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी,
लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी
व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sanjay-raus-claim-of-trying-to-oust-ajitdadanna-from-mahayutitun/