सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने
पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील
सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह
आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता.
त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली
जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील ४८ तासाकरिता
येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार
पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता
असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी केले आहे.
हवामान विभागाने १० व ११ सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तू, विद्युत खांब किंवा झाडाजवळ राहू नये,
झाडाखाली आसरा घेऊ नये. मुसळधार, अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले,
ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदी किनाऱ्यावरील गावांतील
नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी,नाल्याच्या
पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये.
तलाव, बंधारा, नदी आदी ठिकाणी नागरिकांनी पर्यटनासाठी जाणे टाळावे
व धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह करू नये, असे आवाहनही जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-heads-various-committees-in-action-mode/